खरंच शेवग्याच्या बिया पाणी शुद्ध करतात का?

शेवग्याच्या बिया पाण्याचे शुद्धीकरण साधारणतः1 ते 2 तासांच्या आत पूर्ण होते.

या प्रक्रियेत, शेवग्याच्या बियांची एक ग्रॅम पावडर एक लिटर पाण्यात टाकल्यास ती पाण्यातील गाळ, क्षार (टीडीएस) कमी करते आणि जंतुनाशक म्हणून कार्य करते.

पाण्यातील हानिकारक घटक कमी करण्यासाठी ही प्रक्रिया प्रभावी जंतुनाशक म्हणून कार्य करते

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भूजलामध्ये फ्लोराईडचे प्रमाण उच्च आहे, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात

फ्लोराईडची मात्रा दीड मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा अधिक असल्यास ते शरीरासाठी अपायकारक ठरते

शेवग्याच्या बियांचा उपयोग पाण्यातील फ्लोराईड आणि आर्सेनिक कमी करण्यासाठीही केला जातो.

या प्रक्रियेमुळे पाण्याची गुणवत्ता सुधारते आणि त्यातले हानिकारक घटक गाळले जातात.

डॉ. मोघे यांनी याबाबत विविध प्रयोग करून हे सिद्ध केले आहे की शेवग्याच्या बियांचे प्रभावी प्रमाण आणि वापर कसा असावा यावरही त्यांनी संशोधन केले आहे